Ideas

सर्व निराधारांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य द्या


डाव्या पक्षांचे जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन 

गडचिरोली :  संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य करावे यासाठी शेतकरी कामगार पक्षासह डाव्या मित्रपक्षांनी वेळोवेळी आंदोलने केल्यानंतर राज्य शासनाने या योजनेतील अपंग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य सुरू केले आहे. मात्र इतर लाभार्थ्यांना ही वाढ लागू करण्यात आली नसल्याने सध्याच्या महागाईच्या काळात विधवा परित्यक्ता व वयोवृध्द निराधारांनी अल्प अर्थसहाय्यात आपली गुजराण कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना सरसकटपणे किमान अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य तातडीने लागू करावे या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभरातील विविध तहसील कार्यालयांसमोर शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या डाव्या मित्रपक्षांनी शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्हाभरातील विविध तहसील कार्यालयांसमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन व धरणे प्रदर्शने केले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, डॉ. गुरुदास सेमस्कर, चंद्रकांत भोयर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अभिलाषा मंडोगडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली तहसील कार्यालयासमोर निराधार योजनेचे लाभार्थी ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठिय्या मांडून आंदोलन केले. यावेळी रामदास दाणे, किसन साखरे, महागू पिपरे, गजानन झाडे, एकनाथ मेश्राम तरकडू भोयर, मारोती मडावी, माणिकराव शिडाम, देवाजी गेडाम, भाऊजी गुरुनूले, महादेव नैताम, सोमाजी राऊत यांच्या सह शेकडो निराधार लाभार्थ्यी उपस्थित होते.

धानाला शासनाने साडेतीन हजार रुपये हमीभाव द्यावा या मागणीचाही  समावेश असलेल्या या आंदोलनाचे आरमोरी येथील तहसिल कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, विठ्ठल प्रधान, राजू सातपुते, अशोक शामकुळे, रमेश मेश्राम, प्रमोद कोजेकर, अर्चना मारकवार, रंजना कुंभलकर यांनी केले. यावेळी आंदोलन स्थळी येवून नायब तहसीलदार दोनाडकर यांनी निवेदन स्वीकारले.
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते, युवक नेते भाई अक्षय कोसनकर, आकाश आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो निराधार लाभार्थ्यींनी एट्टापल्ली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात केले व तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात लुला गावडे, झुरु आत्राम, सुनिता लेनगुरे, अम्माबाई गावळे, सुंदरा निकुरे, काशीबाई सडमेक, ईश्वर गावळे, मैना बावणे, उज्वला पुंगाटी, चैतेबाई तलांडे, निलाबाई निकोडे, मंगरु मडावी यांच्यासह शेकडो निराधार सहभागी झाले होते.
चामोर्शी येथे आंदोलना नंतर चामोर्शी तहसीलदारांना शेतकरी कामगार पक्षाच्या कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई पवित्र दास, रामबाबा मडावी, दादाजी केस्तवाडे, मंगेश दास, बिधान सरकार, गणेश वाठे, शेखर खेडेकर, रविंद्र येनप्रेड्डीवार, गिरिधर चुधरी, सुधाकर कुसराम यांच्या नेतृत्वात तर मुलचेरा येथील तहसीलदारांना तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम, राकेश मरापे, कालीदास चौधरी, पियुष पेंदाम, ध्रुप आत्राम, भैय्याजी कडते, सुरेश कुळमेथे, राहुल सिडाम, यमुनाबाई पेंदाम, दिपक कुळसंगे यांच्या सह शेकडो निराधार लाभार्थी या एक दिवसीय ठिय्या आंदोलन व निदर्शनात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments