Ideas

चामोर्शी तालुक्यातील रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती उत्खनन





चामोर्शी १३:- तालुक्यातील रेती घाटावर अवैद्य रेती वाहतूक करण्यासाठी रेती तस्करी करणाऱ्यांनी कारवाईपासून वाचण्याकरिता व स्वतःला आर्थिक जास्त लाभ व्हावा म्हणून जादा दराने वाळूची विक्री करण्यासाठी सकाळ, दुपार, सायंकाळ जसे काही डॉक्टरचे टॅबलेट लागले आहेत अशा प्रकारे खुलेआम वाळूची तस्करी केल्या जात आहे. इतकी हिंमत यांच्यात आली तरी कुठून? आणि यांच्यावर कठोर कारवाई करणार तरी कोण?... असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आपल्या ट्रॅक्टरवर अवैध रीती उत्खननाची कारवाई होईल हे धाक न बाळगता थेट सकाळ, दुपार, संध्याकाळ व सुट्टीच्या दिवशी सुध्दा बोरघाट, तुकुम,कडमगाव  मोहुरली या नदी घाटातून विविध ठिकाणी चोर रस्ते तयार करून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे.
ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करून वाळू विक्रीचा गोरखधंदा राजरोसपणे केला जात आहे.



    शासनाने घरकुलाकरिता झिरो रॉयल्टी इशू केलेली आहे मात्र याचा फायदा रेतीमाफीयाच घेत असल्याचे दिसून येत आहे. 
         जसे की, रॉयल्टी आहे वाघधरा, जयनगर/विक्रमपुर पण रेती येतो चामोर्शी शहरात. कारण जास्त दराने विकणे अशा प्रकारे अवैध रेती वाहतूक व व्यवसाय करणाऱ्या बाबत महसूल प्रशासन अनभिज्ञ कसे? की फक्त  कुंभकर्णी झोप येत असल्याचे सोंग घेतले आहे? 
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या माफियांना रात्रीच्या व सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक करायला मुभा मिळत आहे. अशी चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे. एवढेच नाही तर दीड ते दोन हजार रुपयाला मिळणारी रेती गरीब असो की सामान्य नागरिकांना रेती घाट लिलाव न झाल्याने रात्रीच्या व सकाळच्या वेळेस टाकणाऱ्या रेती माफिया कडून चार ते पाच हजार रुपयाने घ्यावी लागत असल्याने गरीब नागरिकाला घर बांधण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय?  असे चित्र पाहायला मिळत आहे. तरी लवकरात लवकर रेती तस्कराबाबत एक स्पेशल कमिटी स्थापन करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments