Ideas

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मीळण्यासाठी तहसील कार्यालय अहेरी येथे साखळी उपोषणाला सुरूवात



माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची साखळी उपोषणाला भेट..!!


📝अहेरी आल्लापल्ली -आष्टी ३५३(C) या राष्ट्रीय महामार्गावरून एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोह प्रकल्पातून लोहयुक्त असलेला चुरा दगड याच मार्गाने दररोज हजारो जडवाहनाची दळणवळण होत आहे मात्र या आलापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्गावरील दुतर्फा रस्त्यालगत असलेल्या शेतांमध्ये लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनामूळे धूळ  पसरून उभी पिके पूर्णतःनष्ट झाले,यामुळे शेतकऱ्यांची पिकांची अतोनात नुकसान झाले आहे मात्र नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीची नुकसान भरपाई मीळण्यासाठी बोरी,शिवणीपाठ, रामपूरचेक,राजपुर पंँच खमनचेरू ईतलचेरू येथील शेतकऱ्यासह गडचिरोली येथील जिल्हाधिकारी श्री संजय मीना  दिनांक १० नोव्हेंबर 2022 व ८ डिसेंबर २०२२ व‌ १९ डिसेंबर २०२२ला  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकांची भरपाई मिळण्याकरिता निवेदन सादर करण्यात आले मात्र निवेदन देऊन तिन महिन्याचा कालावधी लोटूनही अजून पर्यंत शासन व प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिलेली नाही करिता  नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी शेतीची नुकसान भरपाई मीळण्याकरीता तहसील कार्यालय अहेरी येथे दि.२ जानेवारी २०२३ पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली असून या साखळी उपोषणात बोरी,रामपूरचेक, राजापूर पँच, शिवनीपाठ, खमणचेरू, इतलचेरु, या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह उपोषणात उपस्थिती होते  यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पुकारलेल्या साखळी उपोषणाला भेट देऊन या साखळी उपोषणाला आदिवासी विध्यार्थी संघटनेचा पाठिंबा असल्याचे उपस्थितीत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सांगितले यावेळी खमनचेरु ग्रामपंचायत चे सरपंच सायलू मडावी,राजपूर पँच ग्रामपंचायत चे सदस्य मधूकर वेलादी,प्रभाकर मडावी
      अर्जुन शेंडे,पत्रु ठाकरे,सुरेश आदे,गोपाळ आदे,बाबुराव आदे,नागेश मोहुर्ले,दशरथ निकोडे,बिच्छू कंपेलवार,शंकर निकेसर,यादव कोकीरवार,चंदू मोहुर्ले,फकीरा निकेसर,विलास निकेसर,बापू‌ ठाकरे, दिनेश मडावी आदि शेतकरी बांधव उपस्थित होते..!!

Post a Comment

0 Comments